तिला आज बिलकुल चैन पडत नव्हती. office च काम पटापट संपवून केंव्हाची घड्याळ पाहत बसली होती, तीन मिनिटात अकराव्यांदा तरी तिची नजर त्या घड्याळाकडे गेली असेल. “शी बाबा, अजून अर्धा तास, कधी संपणार कोण जाणे? हि वेळ न नको तेंव्हा पळत असते आणि आज जाता जाईना”. पुन्हा एकदा चौफेर नजर टाकून तिनं पाहून घेतलं बोस नाहीये ना, नाही तर आपल्याला नुसत बसलेल बघून काम द्यायचा. शेजारी कोणाच आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिला हायस वाटल, खुर्चीवर रेलून मागे मान टाकून तिचे विचार सुरु झाले.
आज 1 महिना झाला, आपण त्याच्याशी बोललो नाही, किती फोन आले त्याचे, किती message , किती mails .. पण आपण एकाचं पण उत्तर नाही दिलं. खरचं वेडा आहे तो, किती hurt होत असेल प्रत्येक वेळी तरी करून करून, तरी प्रत्येक वेळी नव्यानी try करतो. खर मला राग आला कि कंट्रोल होतं नाही पण राग गेल्यावर वाईट वाटत राहत कि मी ह्याच्याशी अशी का वागते. ह्याला आपली किती गरज आहे, केवढ प्रेम आहे, सहनशक्ती आहे. आपण का असे, आपल्याला का नाही अशी याची गरज. कसं आपण ह्याच्या पासून दूर राहतो दिवसदिवस
पण चूक सुद्धा हाच करतो. दोन दिवस तर गेले होते बाहेर मैत्रिणींसोबत, त्यातून तिथ range नाही मोबाईलला. मग कशी ह्याला फोन करणार? आणि
घरी येते ना येते तोच घरात पाहुणे, कोण कुठले नातेवाईक असतात, एक सुद्धा धड आठवत नाही, पण तुच्या पाहुणचार तर करावाच लागतो ना. इतक दमून पण ह्याला भेटले. तर लगेच चिडला, तुला वेळच देता येत नाही, तुला किंमतच उरली नाही, हेच का तुझ प्रेम. मला इतका राग आला ना. एक तर इतक्या दिवसांनी भेटलो, आणि परत भांडायचं. नुअस्ता वैताग आणि चिडचिड झाली माझी.
मग रागातच म्हणाले, नाहीच उरलं जा प्रेम. आणि त्या नंतर अजून बोलले नाही…
वेडा, रोज माझी नेहमीच्या stop वर वाट पाहत असेल, पण मी गाडीवरून यायला लागले मुद्दामून. पण आता हळूहळू वाटतय बस झाला राग, प्रेम करते ना, मग मी पण थोड adjust केल पाहिजे ना. सगळ माझ्या मनासारख तर होत, मग कधी कधी त्याच पण ऐकल पाहिजे ना..वेडीच आहे मी पण, कधी कधी खूपच त्रास देते. आज त्याला भेटून छान surprise देते आणि sorry पण म्हणते.
तिनी डोळे उघडून घड्याळ पाहिलं, ६ ला ५ मिनिट कमी होते, तिनी पटकन पर्स उचलली आणि पार्किंगकडे पळाली. १५ मिनिटात त्यांचा नेहमीचा stop आला. अजून त्याचा काही पत्ता नव्हता. मनात खट्टू झाली ती, तिला वाटल होत तो तिथच असेल बाईक वर तिची वाट पाहत उभा, आणि तिला पाहून त्याच नेहमीच आभाळभर हसू भरून येईल दोघांच्या मध्ये.
पण तो नाहीच आहे तिथ. शेजारी गाडी लावून ती बसून राहिली… दहा मिनिट झाले, पंधरा मिनिट, इतका वेळो कुठे आहे हा. ह्याच office तर लवकर सुटत, नवीनच जॉईन झालाय ना मग जास्त काम नसत सध्या त्याला. ती ओढणी बोलावर गुंडाळत स्वताशीच बोलत बसली, आता काय करायचं, कोणाला विचारू, त्याचे मित्र तिला आवडत नाहीत, खूप टवाळक्या करतात, हा कसं राहतो त्यांच्यात देव जाणे. एकाचाही number नाही आपल्याकडे. आणि ओफ्फिचे नवीन, सो तिथला number पण नाही माहित.
खूप काम आल वाटत त्याला, फोन पण उचलेना. किती वेळा try केला, रिंग वाजून वाजून बंद पडतीये, का मला शिक्षा देतोय मी त्याला वाट पाहायला लावली म्हणून. छे, असा काही करायचा तो विचार पण नाही करणार, खूपच साधे आहे तो, सगळ्यांपासून वेगळा. म्हणून तर एका भेटीत प्रेमात पडले त्याच्या. पण मग काय झालं असेल..
आता तर पाऊण तास झालाय, ती समोरची दोन पोर सारखी चक्कर मारून जातायत, कुठे आहे हा यार? काय चाललय याच?. का याच पण प्रेम संपल? मी दूर राहिले महिनाभर तर ह्याच मन बदललं? मला तर म्हणायचा कि आयुष्भर तुझी वाट पाहीन. आणि १० दिवसातच भूत उतरलं का काय, कालच १० वेळा तरी फोन आला होता आणि मी उचललाच नाही. पण त्यानंतर तर एकही mail नाही, message नाही, खरचं बदलला वाटत हा..
का ह्यांनी पण ठरवलंय लांब राहायचं, तरीच माझ्या msg ला reply देईना.
दोन तास झाले हा, आता मात्र खूप झाल ह्याच, ह्याला काय वाटत मी आयुष्यभर वाट बघीन का काय? स्वत तर मोठमोठ्या बाता मारायचा, मी जन्मोजन्मी तुझाच राहीन, तुझी वाट पाहीन, तुझ्या शिवाय कुठे जाऊ? आणि आता बघा, मी वाट पाहून पाहून वैतागले इथे, जाणारे येणारे प्रत्येक जन वळून वळून बघतायत, आईचा पण दोन वेळा फोन येऊन गेला. आज हयान सगळी हद्द पार केलीये. मी माझा राग विसरून ह्याच्याकडे आले आणि ह्याला काही किंमतच नाही. मी मूर्ख आहे, मला वाटत होतं कि हा आजही इथेच उभा असेल. तो गेला असेल आपल्या मार्गांनी, त्याला पण नसेल उरली आता माझी गरज.
जाऊ दे, जा खड्ड्यात, आयुष्यात कधी परत येते का बघ ह्याच्याकडे, ३ तासापासून वेड्यासारखी वाट पहिली, फोन केले, msg केले, पण ह्याचा कहिओ response च नाही.मला आधीच कळायला पाहिजे होते, काही साधसारण नसता कोणी, प्रत्येक जन स्वार्थी असतो आणि वेळ आली कि स्वताची कातडीबचाव मोहीम आधी सुरु करतो. बास्स, छान धडा शिकले मी आज आयुष्यात, परत कधी कोणावर इतकी विश्वास नाही ठेवणार. आणि आयुष्यात परत कधी ह्याच नाव नाही घेणार. तिनी गाडी start केली आणि एकही सेकंद वाट न बघता निघून गेली.
समोर दोन पोर बसली होती, पहिला दुसऱ्याला म्हणाला, आज पण हि पोरगी इथे ३ तास बसली होती. काही कळत नाही राव रोज काय करते हि एकटीच बसून?
दुसरा म्हणला, अरे तुला माहित नाही का? १ महिन्यापूर्वी इथे एका पोराचा accident झालं होता ना, त्याची हि item आहे. म्हणतात कि तो मरायच्या आधी ह्याचं भांडण झाल होता आणि तो रोज हिची वाट पहायचा इथेच, पण हि कधी आली नाही. त्याच जागी उभा राहून गेला बिचारा.. आणि त्या दिवसापासून हि रोज इथे येते. काय माहित आता हि त्याची वाट का बघते? ………………
avadala.
Thanks Kiran
zakkas imagination ahe bai tuzi
Thanks
जब्बरदस्त !!!!!! हललो आतून.. शेवट किंचित प्रेडिक्टेबल असूनही पूर्णवेळ गुंतलो होतो.. सुंदर मांडणी.. अजून येउदे..
हेरंब, इतका सुंदर झाला असेल लेख असं वाटल नव्हत. शेवट जरा bollywood टाइप झालाय खरा, पण मला तोच जास्त योग्य वाटला.
खूप आभार…
मस्तच! छान उकल केलीस.
ताई….
मस्तच झाली आहे पोस्ट..खरच आतुन हलवुन टाकणारी…
देवेंद्र, खूप खूप आभार…
phar sundar, manapasun avadala
Thanks Ajay, Khup divasani comment dilis…
शेवट बिलकुल बॉलीवूड टाईप नाहीये…मला फारच आवडली कथा! फारच!
खूप खूप आभार विद्याधर
nice its real nice
Thanks a lot
सॉरी उशिरा कॉमेंटतोय..
खूपच सुंदर मन हेलावून टाकणारी..